धोंडो केशव कर्वे




****भारतरत्न महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रोवणारे क्रियाशील समाजसुधारक.
**कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची.
***आपल्या गावी सार्वजनिक कामे व्हावीत म्हणून त्यांनी 'मुरुड फंड' योजना सुरू केली होती
***अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते.
**सन १८९७ मध्ये "विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळा"ची स्थापना त्यांनी केली. तसेच पुण्याला पेरु गेटजवळ "अनाथ बालिकाश्रम मंडळा"ची स्थापना करून त्या प्रकल्पाला स्वतः पाच हजार रुपयाची देणगी दिली. पुढे १९०० मध्ये श्री गोखले यांनी आपली हिंगणे येथील जागा आश्रमाला विनामूल्य दिली. हाच "हिंगणे महिलाश्रम". त्यांनंतर"महिलाश्रम हायस्कूल", "पार्वतीबाई अध्यापिका शाळा", "आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा" अशा संस्था महाराष्ट्रात निर्माण झाल्या.
**त्याकाळात बालविधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी 1900 मध्ये विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली.
**अण्णांनी 1904 साली हिंगणे येथील माळावर सहा एकर जागा मिळविली. तेथे छोटेसे घर बांधून अनाथ बालिका व निराधार विधवांसाठी वसतिगृह बांधले. ते स्वतही तेथेच राहू लागले. त्यांचे हे घर म्हणजे दुर्दैवी स्त्रियांचे माहेरघर होते. अण्णांनी या निराधार स्त्रियांसाठी तेथे प्राथमिक व माध्यमिक शाळा काढली. पुढे महिलांसाठी महाविद्यालय व महिला विद्यापीठाची स्थापना ही केली. विद्यापीठाचे संघटनात्मक काम स्वत अण्णा जातीने बघत असत. हे विद्यापीठ प्रथम पुण्यास होते. विद्यापीठासाठी विठ्ठलदास ठाकरसी यांनी मोठी देणगी दिली. त्यामुळे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) असे नाव देण्यात आले. हे विद्यापीठ पुण्याहून मुंबईस आले. सरकारची विद्यापीठाला मान्यता मिळाली. भारतातील हे पहिले महिला विद्यापीठ आहे...........!!!!!
**मध्यंतरीच्या काळात अण्णांच्या पत्नी निवर्तल्या. त्यानंतर त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहामुळे मुरूड गावानी अण्णांना वाळीत टाकले होते. अण्णा शतायुषी झाले. त्यावेळेस मात्र याच गावानी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. यातच अण्णा, त्यांचे कार्य याची थोरवी लक्षात येते...!!1

**महिला स्वावलंबी व्हाव्याम्हणून त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण देणाऱया संस्था त्यांनी पुणे, मुंबई, वाई, सातारा इत्यादी अनेक ठिकाणी काढल्या. महिलांच्या उद्धारासाठी झटणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी 1910 मध्ये निष्काम मठ स्थापन केला.
**1936 साली ग्रामीण शिक्षणासाठी "महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ" स्थापन केले.
**अस्पृश्यता निवारणासाठी 1944 मध्ये "ग्रामाशिक्षण मंडळ" व "समतासंघ" स्थापन केला.
**आज मुरुड या त्यांच्या जन्मगावी अण्णांच्या घरात 'कर्वे वाचनालय' सुरु करण्यात आले आहे.
**भारत सरकारने त्यांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिटही काढले."भारतरत्न" व "पद्मविभूषण"या गौरवशाली पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले
***त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. अण्णासाहेब कर्वे यांचे वयाच्या 104 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 1962 रोजी निधन झाले...!!!!
***र.धों. कर्वे यांची ग्रंथसंपदा -
संततिनियमन,गुप्त रोगांपासून बचाव,वेश्याव्यवसाय,आधुनिक आहारशास्त्र,आधुनिक कामशास्त्र,त्वचेची निगा ,संतति नियमन - विचार व आचार इ.......!!!

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद




*****१ नोव्हेंबर १९५६ पासून गेली ५५ वर्षे आपल्या प्राणाची बाजी लावून कर्नाटक सरकारच्या आडमुठय़ा धोरणाविरुद्ध लढत आलेल्या आणि त्या लढय़ाचे यज्ञकुंड सतत धगधगत ठेवण्यासाठी आपल्या हौतात्म्याच्या रूपाने त्यात आपली समिधा टाकत आहे...

****जनतेच्या न्याय्य लढय़ाबाबत सातत्याने नाक मुरडत आलेल्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेदेखील दि. १० नोव्हेंबर १९५८च्या अग्रलेखात केंद्र सरकारला शालजोडीतला आहेर केलेला आहे. तो अग्रलेख म्हणतो, ज्या राष्ट्राने लोकशाहीवादी राज्यघटना निर्माण केली, राज्यांची भाषावार पुनर्रचना केली, एवढय़ा खंडप्राय देशात निवडणुका घेण्याची तरतूद केली आणि योजनाबद्ध अर्थव्यवस्थेचा उपक्रम सुरू केला, त्या राष्ट्राला फक्त काही हजार चौरस मैलांच्या वादग्रस्त सरहद्दीचा प्रश्न सोडविणे खरोखरच एवढे कठीण आहे काय, हा प्रश्न ज्या रीतीने भिजत आणि कुजत ठेवला गेला आहे, त्यावरून अशा असंतोषाच्या गड्डय़ाबद्दल नवी दिल्ली कमालीची उदासीन आहे या संशयाला पुष्टीच मिळते..

*****..दोघा संबंधित मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवावा असे जेव्हा नेहरू सांगतात, तेव्हा तर त्यांची ही भूमिका अधिकच निष्फळ ठरते. ही भूमिका मुळीच मुद्देसूद नाही. कारण या दोघाही मुख्यमंत्र्यांनी तडजोड करण्यास आपण असमर्थ आहोत असे यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. या दोन मुख्यमंत्र्यांचे ज्या अर्थी एकमत होत नाही आणि केंद्र सरकार ज्या अर्थी हस्तक्षेप करीत नाही त्या अर्थी या दोन राज्यांच्या दरम्यानच्या सीमाभागात असंतोष आणि सत्याग्रह धुमसतच राहील.

***********राज्य पुनर्रचना आयोगाच्या ‘अव्यापारेषु व्यापाराचा’ एक नमुना म्हणजे त्यांनी ५४ टक्के तेलुगू भाषक असलेला कोलार जिल्हा आंध्राला देण्याऐवजी तो म्हैसूरला बहाल केला. कन्नड भाषा बोलणाऱ्या बेल्लारी जिल्हय़ाचा पूर्व भाग (बेल्लारी शहर व बेल्लारी तालुका) विनाकारणच आंध्राला दिला आणि त्यांच्या या मनमानी वर्तनाचा कळस म्हणून बेळगाव जिल्हय़ाचा मराठी भाषक प्रदेश म्हैसूर राज्याला देऊन टाकला! जो बेल्लारी तालुका त्यांनी कारण नसतानाच आंध्र राज्याला दिला त्याची भरपाई करण्यासाठी म्हैसूर राज्याच्या पारडय़ात त्यांनी तेलुगू भाषक बहुसंख्य असलेला कोलार जिल्हा (जो खरेतर आंध्राला द्यायला हवा होता) व बेळगाव जिल्हय़ातील मराठी भाषक भाग बिनदिक्कतपणे टाकून दिला.(अहवालातील परिच्छेद ३२२ मध्ये दिले गेले आहे) [ **आयोगाच्या या पक्षपाती धोरणामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काची ८६५ गावे आज कर्नाटकात आहेत]


*****बेल्लारी तालुक्याची भरपाई करण्यासाठी बेळगाव जिल्हय़ाचा मराठी भाषक प्रदेश कर्नाटकला बहाल करण्यात आला.
संसदेत कायदा पारित होत असताना तो बेल्लारी तालुका आंध्रला देण्याऐवजी तो पुन्हा कर्नाटकाला देण्याची कार्यवाही केंद्र शासनाने केली. मात्र कर्नाटकची नुकसानी भरून काढण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या हक्काचे बेळगाव आणि मराठी भाषक प्रदेश कर्नाटकाला देण्यात आला होता. 

*****मराठी जनतेच्या चळवळीमधून सेनापती बापट प्रभृतींच्या बेमुदत उपोषणाचा भाग म्हणून केंद्र शासनाने १९६६ साली न्यायमूर्ती महाजन कमिशनची नियुक्ती केली. तथापि या कमिशनला त्यांनी जाणीवपूर्वक कसलीही कार्यकक्षा (टम्र्स ऑफ रेफरन्स) ठरवून दिली नाही.

****दि. २५ डिसेंबर १९५६ रोजी त्या वेळचे म्हैसूरचे मुख्यमंत्री निजलिंगप्पा यांचे विधानसभेतील भाषण यासंदर्भात उद्धृत करणे उचित ठरेल. ते म्हणाले, ‘या राज्यात कन्नड भाषेखेरीज इतर भाषा बोलणाऱ्या लोकसमूहांचे फार मोठे टापू समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या मायबोलीच्या राज्यात जायचे असेल तर त्याबाबत मी कोणत्याही प्रकारची खळखळ करणार नाही. अर्थातच ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही कालावधी लागणे अपरिहार्य आहे. तथापि हे भाषक विभाग त्यांच्या त्यांच्या मायबोलीच्या राज्यात समाविष्ट होईपर्यंत हे लोकसमूह या राज्यातच राहणार आहेत. त्या कालावधीत या अन्य भाषकांना या राज्यात अतिशय सन्मानाने वागविण्यात येईल, अशी मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नि:संदिग्ध ग्वाही देतो.’

****त्यांचे रेशनकार्ड, त्यांच्या शेतजमिनींचा सातबाराचा उतारा, त्यांच्या शेतीपंपाच्या विजेचे बिल, त्यांच्या घराच्या फाळय़ांचे बिल, त्यांच्या घरातील विजेचे बिल कन्नड भाषेतच स्वीकारावे लागते. कोणत्याही शासकीय कचेरीमध्ये त्यांना कन्नड भाषेतच अर्ज करावा लागतो. कोणत्याही न्यायालयातील कामकाज फक्त कन्नड भाषेतच चालते. या सर्व गोंधळात तेथील मराठी भाषक माणूस हरवलेला आहे......!!!

******हा सीमाप्रदेश आता कायमचाच आपल्या टाचेखाली ठेवण्याच्या निर्धाराने त्यांनी लोकशाहीचे आणि सामाजिक न्यायाचे एकूण एक संकेत धाब्यावर बसविलेले आहेत. या सीमाभागात कोणत्याही मराठी भाषक संस्थेला मराठी भाषा, लिपी व संस्कृती यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कर्नाटक शासनाने १९५६ सालापासून एक नया पैसा अनुदान दिलेले नाही!..

सीमाभाग हा ५५ वर्षांनंतरही अद्यापि वादग्रस्त प्रदेश आहे. तो तेथेच राहणार की महाराष्ट्रात समाविष्ट होणार हे अद्याप ठरायचे आहे..........??????????????????????????.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम




(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)

१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ मातृ निधन.
१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ पितृनिधन.
१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च विवाह.
१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
१९२५ जाने.७ कन्या “प्रभात” हिचा जन्म.
१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.
१९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
नि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.
१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भारत’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालीयन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मेझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराप सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रानी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.

Regarding English-CSAT


CSAT Preparation


Preparation for preliminary Examination


UPSC 2011


स्वा. सावरकरांच्या काव्याचे क्रांतीकार्य !



स्वा. सावरकरांनी खङ्गासारख्या धारदार आणि लखलखीत लेखणीrद्वारे राष्ट्राला भव्योदात्त आणि स्फूर्तीदायी साहित्य देणे  ‘मृत्युंजय स्वा. सावरकर यांची वाणी आणि लेखणी खड्गासारखीच धारदार आणि लखलखीत होती. त्यांनी जे ज्वलंत साहित्य उभ्या राष्ट्राला दिले, ते आकाराने जेवढे भव्योदात्त तेवढेच गुणवत्तेमध्येही कांतीमान, स्फूर्तीदायी अन् चिरंजिवी ठरले आहे. 



जयोऽस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुत्वां वंदे ।।


अर्थ : हे महान मंगलदायक, शिवाच्या चरणांजवळ रहाणार्‍या, शुभफल देणार्‍या, स्वतंत्रता देणार्‍या श्री भगवतीदेवी तुझा विजय असो ! यश देणार्‍या देवी, तुला मी वंदन करतो.

पुण्यामध्ये १९३० साली सावरकरांनी स्वतंत्रतेचे हे स्तोत्र रचले. अद्यापही या स्तोत्राची जादू अजून कायम आहे आणि यापुढेही राहील.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २०)
स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे असून दीपस्तंभाप्रमाणे भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देणार असणे 
 ‘कल्पनेच्या विहारातही स्वा. सावरकरांना वास्तवाचे विस्मरण झालेले नाही. त्यांच्या प्रतिभेचा एक पंख आकाशात विहार करणार्‍या काव्यमय कल्पनाशक्तीचा होता, तर दुसरा पंख भूतलावर संचार करणार्‍या वास्तववादी चिकित्सकबुद्धीचा होता. साहित्याच्या द्वारे स्वमत प्रचार करण्याचे जे अनन्यसाधारण सामर्थ्य नि कौशल्य स्वा. सावरकरांच्या लेखणीत होते, ते इतर कोणाही भारतीय लेखकात असल्याचे आढळत नाही.
त्यांच्याप्रमाणे दुसर्‍या कोणत्याही लेखकाने महाराष्ट्रात एवढी प्रचंड खळबळ उडवून दिली नाही किंवा इतके प्रक्षुब्ध विचारमंथन घडवून आणले नाही. स्वा. सावरकरांनी अकरा हजार पृष्ठांचे साहित्य लेखन केले. वाङ्मयातले सर्व साहित्यप्रकार हाताळले. स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे आहे. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे साहित्य भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देत राहील. हा चिरंतन साहित्यिक भावी भारताला नवी स्फूर्ती नि नवे धैर्य अखंड पुरवत राहील, यात शंका नाही.’ - शंकर दत्तात्रय गोखले (‘स्वातंत्र्यवीर जन्मोत्सव विशेषांक २००८’, पृष्ठ क्र. २६)

हे मातृभूमी ! तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तुतेची अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला ।। 
 - स्वातंत्र्यवीर सावरकर, १९१०

मराठीतील ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ निर्माण करणारे सावरकर !  
‘स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील ‘स्वातंत्र्य सूक्ते’ आहेत. ज्या रमणीय उषःकाली क्रांतदर्शी मंत्रद्रष्ट्या वैदिक ऋषींना वेदांतील सूक्ते सुचली, तशाच एका रमणीय पावनक्षणी सावरकरांना ही ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ स्फुरली असतील. स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयातील पुरुषसूक्त आहे.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २२)
ज्वालाग्राही कवितांच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवणारे सावरकर !
‘प्रत्येक थोर व्यक्तीच्या मागे काहीतरी प्रेरणा असते. त्याशिवाय त्या व्यक्तीच्या हातून भरीव कार्य होतच नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकरांच्या मागे ‘कवीवर्य सावरकर’ भक्कम उभे होते. त्यांची ज्वालाग्राही कविताच त्यांना प्रत्येक कार्यात प्रेरणा देत होती. आयुष्यभर त्यांना कवितेने खर्‍या अर्थाने आधार दिला. कवितेच्या आधारावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवला.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २१)

साहित्याद्वारे हुतात्म्यांच्या अनेक मालिका पोसणारे सावरकर ! 
‘लेखणी’ आणि ‘वाणी’ या उभय शक्ती केवळ देशासाठी ज्याने अखंड वाहून टाकल्या होत्या, असा सावरकरांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही साहित्यिक भारतात आढळून येत नाही. त्यांचे वाङ्मय वाचकांच्या अंतःकरणात नवीन आशा फुलवणारे नि नवे धैर्य निर्माण करणारे आहे. देशभक्ताला स्फूर्ती देणारे, तत्त्वमीमांसकाला विचार करायला लावणारे आणि स्वातंत्र्य नि जनहित यांच्यासाठी शूराला धर्मयुद्धाला प्रवृत्त करणारे असे त्यांच्या वाङ्मयाचे सामर्थ्य आहे. त्यांचीच एक लेखणी अशी होती की, जिथे हुतात्म्यांची मालिकांची मालिका स्वतःच्या दुधावर पोसली होती. इतिहासातील ही अभूतपूर्व आणि अजोड घटना आहे.’ - शंकर दत्तात्रेय गोखले (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २६)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले गीत स्वातंत्र्यानंतर १६ वर्षांनी आकाशवाणीवरून लावणारी सावरकरद्वेष्टी काँग्रेस ! : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले.....,’ हे अजरामर गीत आकाशवाणीवर लागायला स्वातंत्र्यानंतर १६ वर्षे जावी लागली. हे एकच गीत लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर थांबले असते, तरी राष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असते; पण गीतकाराच्या द्वेषामुळे त्या गीताचीच महती काँग्रेसने गुंडाळून ठेवली.’ - श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी (दैनिक सनातन प्रभात, ३०.१०.२००६)

  सांगली येथे झालेल्या ८१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात स्वा. सावरकरांच्या विचारधारेला नगण्य स्थान देण्यात आले. ज्या माणसांची स्वा. सावरकरांच्या पायापाशी बसण्याची पात्रता नाही, त्यांना या संमेलनात मानाचे स्थान देण्यात आले.

भाषाशुद्धी
स्वा. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीचे महत्त्व 
स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धी केली नसती, तर एव्हाना मराठीमध्ये उर्दूमधील २० टक्के आणि इंग्रजीतील ३० टक्के शब्द प्रचलित झाले असते अन् मराठीचे मराठीपण संपले असते. मराठी भाषेचे अशुद्धीकरण सुरूच राहिले असते, तर हल्ली ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही, तशी १०० वर्षांनी हल्लीची मराठी कळली नसती. संस्कृतची जी स्थिती स्वातंत्र्योत्तर काळात झाली, तशी स्थिती मराठीचीही झाली असती.

स्वा. सावरकरांचा भाषाशुद्धी-शब्दकोश
सावरकरांनी अनेक परकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द योजले. हे शब्द शोधतांना त्यांनी मराठीचे मराठीपण आणि नित्याच्या भाषेचे सोपेपण नष्ट होणार नाही, याची दक्षता घेतली. परकीय शब्दांना सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच पण नव्याने प्रचारात आणलेले असे अनेक शब्द त्यांच्या ‘भाषाशुद्धी’ या ग्रंथाच्या शेवटी ‘भाषाशुद्धी-शब्दकोश’ या मथळ्याखाली देण्यात आले आहेत.

स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी शब्द बोकाळू देणे, म्हणजे औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेणे 

आपले तदर्थक जुने उत्तम शब्द असतांनाही किंवा नवीन स्वकीय शब्द उद्भावन करणे शक्य असतांनाही त्या जुन्या शब्दांस लुप्त करून टाकणार्‍या किंवा त्या नव्यांची नाकेबंदी करणार्‍या आणि म्हणूनच अगदी अनावश्यक असणार्‍या विदेशी शब्दांस, मग ते उर्दू असोत वा इंग्लिश असोत वा इतर कोणतेही असोत, स्वभाषेत, निष्कारण वावरू देऊ नये. आपला स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी बोकाळू देणे, हा काही शब्दसंपत्ती वाढवण्याचा मार्ग नव्हे आणि औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेत सुटणे, हा काही वंशविस्ताराचा मार्ग नव्हे.

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता


गेल्या सात दिवसांपासून इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या राजकीय अस्थिरतेचे नेमके कारण काय? इजिप्तची पार्श्वभूमी, पुढे काय होणार, आंतरराष्ट्रीय दबाव अशा अनेक विषयांवर प्रश्नोत्तर स्वरुपात घेतलेला हा आढावा. 

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता नेमकी कशामुळे आहे? 
- उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी पायउतार व्हावे, या मागणीसाठी जनतेने आंदोलन पुकारले आहे. या क्रांतीचा वणवा देशाच्या २८ पैकी ११ प्रांतांत पोचला आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नेत्यांच्या पोस्टरची जाळपोळ, सरकारविरोधी घोषणाबाजी, सरकारी आस्थापनांवर हल्ले, दगडफेक अशा स्वरूपाच्या कारवाया सुरूच आहेत. 

देशातील दारिद्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांची पातळी वाढल्यामुळे गेली तीस वर्षे सत्ता उपभोगणारे राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष माजला आहे. गेल्या शनिवारी सकाळी शेकडो नागरिक राजधानी कैरोच्या ताहरीर स्क्वेअर या मुख्य चौकाच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ८२ वर्षीय मुबारकयांनी देशाला शांततेचे आवाहन केले. मात्र, सरकार बरखास्त करणारे मुबारक यांनी स्वत: राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, स्वत:च्या सर्व जवळच्या नातलगांची ब्रिटनला रवानगी केली आहे. नव्या सरकारची स्थापना तातडीने होण्याची शक्यता असून नव्या पंतप्रधानांचे नाव मुबारक यांच्याकडून जाहीर होईल.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते महंमद अल् बारदेई या आंदोलनात उतरले आहेत. पोलिसांनी बारदेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारझोड केली, तरी राष्ट्रपतीविरोधी आंदोलन थंडावलेले नाही. बारदेई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलनाने जोर धरला असून, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. अश्रुधुराचा वापर केला जात आहे.

सरकारने मोबाइलवर घातलेली बंदी २४ तासांनी उठवली गेली; मात्र इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे. आंदोलनकर्त्यांनी एसएमएस; तसेच सोशल नेटवर्किंग साइटचे आंदोलनासाठी साह्य घेतले. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कराच्या तुकड्या रणगाड्यांसह सज्ज असून, इजिप्शियन म्युझियम, सेंट्रल बँक आणि कैरो युनिव्हर्सिटी आदी ठिकाणांना संरक्षण देण्यात आले आहे. इजिप्तची राष्ट्रीय विमानसेवा किमान १२ तास ठप्प होती. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी कैरोला जाणाऱ्या फेऱ्याही रद्द केल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेविषयी चिंता व्यक्त केली असून, देशाच्या राजकीय आणि आर्थिक फेररचनेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन मुबारक यांना केले आहे.



इजिप्तची पार्श्वभूमी काय?
- नील नदीच्या किनाऱ्यावर वसलेले इजिप्त ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. इजिप्त आपल्या विशाल पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. येथे राष्ट्रपती होस्नी मुबारक यांनी १९८१ मध्ये सत्ता काबिज केलीअरब देशांत साऊदी अरब नंतर इजिप्त ही अर्थव्यवस्था दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. इस्रायल आणि पॅलिस्टिनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तने महत्त्वाची भूमिका बजावली होती. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार इजिप्तची लोकसंख्या ८.४५ कोटी आहे.
अरबी, इस्लाम आणि पेट्रोल
सुमारे दहा लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या इजिप्त या देशाची प्रमुख भाषा अरबी आहे. देशात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माला मानणारे बहुसंख्य नागरिक आहेत. इजिप्तमधून पेट्रोलियम पदार्थ आणि कापूस हे मुख्यत्वे निर्यात केले जाते.
मुस्लिम ब्रदरहुड ही संघटना  इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची विरोधक संघटना आहे. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहुड वर बंदी घालण्यात आली आहे.
आर्थिक उदारीकरण आणि  बेरोजगारी
होस्नी मुबारक हे एक आर्थिक उदारवादी राष्ट्रवादी नेता आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक सुधारणांचे आश्वासन दिले होते. परंतु, असे असूनही इजिप्तमध्ये बेकारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच लोकांचे राहणीमानाच स्तर खालचा आहे. हेच प्रमुख कारण आहे की, देशात सरकार विरोधी लाट निर्माण झाली.
इजिप्तमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात ४.३ टक्के वाढून प्रति बॅरल ८९. ३४ डॉलर झाल्या आहेत. हीच जर स्थिती कायम राहिल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विशेषज्ञ प्रा. ए. के. पाशा यांच्या मते, इजिप्त आणि ट्यूनिशियानंतर ही सरकारविरोधी लाट इतर अरब देशांमध्येही पसरू शकते. त्यामुळे भारतावर याचा सरळ परिणाम होईल. पश्चिम आशिया अशांतता निर्माण झाली त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. तेलाच्या किंमती वाढल्याने महागाईत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटाला मोठा फटका बसू शकतो.
इजिप्तमध्ये राजकिय परिस्थिती अस्थीर राहिल्यास त्याचा परिणाम समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. आशिया आणि युरोपमध्ये जलमार्गाने होणारा व्यापार हा इजिप्तच्या सुवेज कालव्याने जोडलेला आहे. 


इजिप्तमध्ये पुढे काय होणार ? 

देशात सुरू असलेल्या विरोधानंतर राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणार असतील तर पुढे काय होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार पडले तर त्यानंतर देशाची धुरा कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
ट्यूनिशियामध्ये झालेल्या आंदोलनानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधणे खूप कठीण झाले होते. लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांची पूर्तता करणे येथे कठीण होऊन बसले होते.
इजिप्तमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाचे सरकार असल्याने विरोधी पक्ष कमकुवत आहे. तसेच वैयक्ती आणि वैचारिक पातळीवर विरोधी पक्ष दुबळा आहे. इजिप्तमध्ये अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर मुस्लिम ब्रदरहुड या इस्लामिक पक्षाला व्यापक समर्थन मिळेल, असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.

मुस्लिम ब्रदरहुड हा आधिकृत दृष्ट्या बंदी घातलेला पक्ष आहे. परंतु त्याचे अस्तित्व आता बहुतांशी ठिकाणी जाणवते आहे. इजिप्तमध्ये ही एकमेव संघटना आहे, की ज्यात हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले आहे. २००५मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाला काही जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे सदस्य अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. 
राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर हे इस्लामी क्रांति होणार असल्याचे भासवून आपल्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांना घाबरवत आहेत.
मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेने या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नाही. पश्चिमात्य देशांनी इजिप्तच्या धार्मिक विश्वासांना आणि अपेक्षांचा सन्मान केला पाहीजे असे मत मुस्लिम ब्रदरहुडचे नेते अल एरियान यांनी सांगितले आहे. 

अरब देशात इतरत्र अशी असंतोषाची लाट आहे का? 
आखातातील तसेच आफ्रिकेतील काही मुस्लिम देशांमध्ये तरुणांनी भ्रष्ट नेत्यांना विरोध करण्यासाठी हिंसक क्रांती सुरू केली आहे. ट्युनिशिया, येमेन पाठोपाठ आता इजिप्तमध्येदेखिल अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याचे वृत्त आहे. जॉर्डनमध्येही सत्ताधा-यांविरोधात जनतेत नाराजी असल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.

इजिप्तमधील हिंसक आंदोलन
 उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या भ्रष्ट कारभाराला जोरदार विरोध होत आहे. तरुणांनी रस्त्यावर उतरुन हिंसक पद्धतीने राष्ट्रपती आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ठिकठिकाणी नेत्यांचे पोस्टर जाळणे, सरकार विरोधी घोषणाबाजी करणे, सरकारी आस्थपनांवर हल्ले करणे अशा स्वरुपाच्या कारवाया सुरूच आहेत.

राष्ट्रपती मुबारक यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात शांततेचे आवाहन केले आहे. सरकार बरखास्त करणा-या राष्ट्रपतींनी स्वतः राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र स्वतःच्या सर्व जवळच्या नातलगांची रवानगी इंग्लडला केली आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष नोबेल विजेते मोहम्मद अल बारदेईयांनी होस्नी मुबारक यांचा विरोध करण्यासाठी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मोहम्मद अल बारदेई आणि त्यांच्या सहका-यांनी मारझोड केली तरी राष्ट्रपती विरोधी आंदोलन थंड पडलेले नाही. अखेरच्या वृत्तानुसार, इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्याविरुद्धच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरकड सुरू केलीय. प्रशासनाने मोबाइल तसेच इंटरनेट सेवा बंद केली आहे. मोहम्मद अल बारदेई यांना नजरकैद करण्यात आले आहे. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.

ट्युनिशियाच्या जनतेचा असंतोष
राष्ट्रपती जॉईल अल अबीदीन यांच्या भ्रष्ट कारभाराचा विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मागील २३ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रपती अबीदीन यांनी चालवलेला मनमानी थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची नागरिकांची तयारी झालेली आहे.

डिसेंबर महिन्यात एका बेरोजगार तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याचा चार जानेवारी रोजी मृत्यू झाला आणि अबीदीन प्रशासनाविरुद्ध नाराज झालेले नागरिक रस्त्यावर आले. परिस्थिती इतकी चिघळली की, अबीदीन यांनी देश सोडून थेट सौदी अरेबियात राजकीय आश्रय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या पत्नी दिड टन सोनं घेऊन देशातून पळून गेल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोहम्मद घानोची यांनी नव्याने सरकार स्थापन करुन तब्बल १२ नव्या कॅबिनेट मंत्र्यांची सोबत घेत देश सावरायचे प्रयत्न सुरू केले आहेत.

येमेनचे संकटः
 मागील ३२ वर्षे येमेनमध्ये अनभिषिक्त सम्राटासारखे सत्ता उपभोगत असलेल्याराष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या विरोधात ठिकठिकाणी दंगली सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी सरकार आणि नागरिक यांच्यातच तीव्र संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी नागरिकांची बाजू ऐकून कोणतेही परिवर्तन केलेले नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा साथीदार असलेल्या येमेनमध्ये सुरक्षा पथकांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

होस्नी मुबारक यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे का?
इजिप्तमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्यावर जगभरातून दबाव वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी होस्नी मुबारक यांना इजिप्तची परिस्थिती सुधारण्याची आणि हिंसक आंदोलन संपविण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही परिस्थिती निशस्त्र लोकांवर बळाचा वापर करून नये, आंदोलनकर्त्यांना आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याची संदी मिळायला हवी, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून, जर्मनीचे चान्सलर एंजला मर्कल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोजी यांनी केले आहे. 
अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमध्ये लोकशाही प्रस्थापित होत असते तर इजिप्तच्या जनतेला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. 


Source--- 


धगधगत इजिप्त!
स्टार माझा वेब टीम

Project tiger reserves in the state


Project tiger reserves in the state

http://projecttiger.nic.in/images/MAP-T.jpg
* There are four tiger projects in the state--- Melghat, Tadoba, Pench (all in Vidarbha) and Sahyadri (Western Maharashtra).
* The Melghat, the oldest tiger project in the state, is located on southern offshoot of Satpura Hill Range in Amravati district with an area of 1676.49 sq kms. It is the home of around 45 tigers.
* Tadoba (Chandrapur district) is spread over 623 sq kms of high hills and lush valleys and under dense teak and bamboo forests. The reserve is also a home for rare wildlife, like wild dogs, leopards, and sloth bear, and baison, hyena and jungle cats, along with a population of around 46 tigers.
* In Pench tiger reserves, bordering Madhya Pradesh, is located at a distance of 70 kms from Nagpur and home for around 20 tigers.
* Sahyadri, the new tiger project of the state was set up by including Chandoli Natonal Park and Koyana Wildlife Sanctuary of western Maharashtra. The reserves spread over an area of 741.22 sq kms. It houses an appreciable variety of bird and animal life, including nine tigers and 66 leopards.



Tadoba Tiger Reserve

The Tadoba Tiger Reserve renowned for its natural heritage, is gifted with rich biodiversity. Sprawling over an area of 625.40 sq km, this distinctive eco-system is positioned in the Chandrapur district of Maharashtra.

Tadoba Tiger Reserve in Maharashtra is one of the Project Tiger Reserves in India. The prime purpose of forming the Tadoba Tiger Reserve was protection and conservation of tigers. The sanctuary, set up in the year 1995, is the second Tiger Reserve in Maharashtra. 

The land vegetation of Tadoba Tiger Reserve is Southern Tropical Dry Deciduous Forest. The sanctuary is home to several species of flora such as Teak, Ain, Bija, Dhauda, Haldu, Salai, Semal, Tendu and bamboo.
There are a plethora of animals at Tadoba Tiger Reserve in Maharashtra. Apart from tiger, the various species of fauna spotted in the sanctuary are Leopard, Sloth Bear, Gaur, Rusty Spotted Cat, Ratel, Indian mouse deer, Spotted deer, Sambar, Wild Boar, Four-horned antelope, Wild dog, Flying Squirrel, etc.

Special Projects    

The study of regeneration status of different plant species .
The crop composition in the Tadoba-andhari Tiger Reserve .



Eco-development
Under the Maharashtra Forestry Project funded by the World Bank, ecodevelopment activities have been taken up in ten villages situated on the periphery of the Reserve.
Village Forest Protection Committees

No village Forest Protection Committee has been formed. However, the village Eco-development Executive Committees have a reciprocal agreement with the Reserve management for protection of the Reserve in lieu of the village ecodevelopment inputs received.

Education and Awareness
In the Tadoba-andhari Tiger Reserve on the eve of the Wildlife Week children up to high school standard from nearby villages and town are brought by Reserve bus to Tadoba and given environment and wildlife education and quiz tests are organised.

Melghat Tiger Reserve

Melghat tiger reserve is located in Amravati district in Central India. It is 25 km from Chikaldhara a hill resort in the south Satpura range also known as Gavilgarh Hills. It is 760 km north east of Mumbai and 225 km west of Nagpur. This reserve has 80 tigers which are spread over 1,674 sq km of vast area. They live mostly in the inner parts of the reserve which are hardly accessible.
Melghat tiger reserve was established as wildlife sanctuary in 1967 and was declared as Tiger reserve in 1974. Its rugged terrain and rocky ravines provide natural protection from the poachers. River Tapi is the northern boundary of the reserve. One can see tigers, sloth bear and flying squirrels apart from monkeys and other fauna. The reserve is home to 2,000 gaur the second largest in India. Melghat is stunning with natural scenic beauty.

Recent News

Agitation against tiger project turns ugly in Satara
Published: Wednesday, Jan 5, 2011, 11:32 IST
By DNA Correspondent | Place: Satara (Maharashtra) | Agency: DNA

The protest march by villagers against the Sahyadri Tiger Project took an ugly turn on Monday evening when angry villagers pelted stones on the forest department (wildlife) office in Patan in Satara district.
The villagers were agitating against the Sahyadri Tiger Project, which was initiated last year by combining the Koyna Wildlife Sanctuary and Chandoli National Park.

Project tiger gets Rs 150 crore grant
Hindustan Times
Nagpur, May 06, 2010

Here's some good news for Vidarbha's two tiger reserves -Melghat and Tadoba! The Union government has decided to release Rs 150-crore grant to relocate villages in the tiger reserves. The state government had sought the assistance to free animals from human interference. The grant would enable the

Maharashtra Forts


There are nearly 350 forts in Maharashtra, so it is said that forts are the glory of Maharashtra. Most of these forts are associated with the great Maratha ruler, Chhatrapati Shivaji Maharaj. It is believed that he developed as many as thirteen forts.

Vijaydurg fort is regarded to be the best sea fort developed by Shivaji. 
Every fort has temple inside that was a powerful inspiration to the Maratha fighters. 510 km away from Mumbai is the famous Sindhudurg and Vijaydurg forts. This twin fort was constructed with the special guidelines from Shivaji. This fort is famous for its serene environmental beauty and its historic importance.


Shivner fort is the fort where Shivaji was born. This fort is nearly about 120 km from Pune.

Pratapgad fort reminds the fiery battle fought between Shivaji and Afzal Khan.

One must see the 300-year old fine architectural fort of Murud - Janjira fort, Lohagad and Visapur Forts, Harishchandragad Fort, Arnala Fort and Ajinkyatara Fort are ideal for trekking. Adventure lovers must visit these forts.

Devagiri Daulatabad FortDevagiri Daulatabad
Devagiri (Daultabad of the later period), 

Murud JanjiraMurud Janjira
Situated on a rock of oval shape near the port town of Murud,





Raigarh FortRaigarh
Raigarh was Shivaji’s capital, the hill fort where he was crowned 

Sindhudurg FortSindhudurg
Sindhudurg fort stands on a rocky island, known as Kurte, 





Panhala FortPanhala
Panhala or Panhalgarh, about 19kms north-west of Kolhapur, is.. 

Vijayadurg FortVijayadurg
Raigarh was Shivaji’s capital, the hill fort where he was crowned 

Ahmednagar Fort
Ahmednagar Fort is one of the best designed forts in the entire state of Maharashtra. At the same time, it is also counted amongst the impregnable forts of India. The fort is situated in the Ahmednagar district and dates back to the year 1559.


Panhala Fort
Panhala Fort is situated at a distance of approximately 19 km from the Kolhapur city of Maharashtra. Counted amongst the largest as well as most significant forts of the Deccan region of India, it stands perched at an altitude of around 850 m above the sea level .

Janjira Fort
Janjira Fort is situated in the Murud town of Maharashtra. Infact, the Island Fort serves as one of the major attractions of the town. Murud served as the erstwhile capital of the Siddi rulers of Janjira in the earlier times. Today, Janjira is counted amongst the few sea forts of India and lies 2 km inside the town.

Raigad Fort
Raigad Fort is a magnificent hill fortress, situated in the Raigad district of Maharashtra. It lies approximately 125 km away from Pune and serves as one of the major excursion of the city. The fort once served as the capital of Chhatrapati Shivaji, the Great Maratha king, in the 1674.

Shivneri Fort
Shivneri Fort is one of the most magnificent as well as historically rich forts of India. It is situated at a distance of approximately 90 km from the Pune city of Maharashtra. The fort dates back to the time period when Shivaji was not even born yet. Shivneri Fort was built under the aegis of Sahaji.

Sinhagad Fort
Adding to the attraction of the Pune city is the Sinhagad Fort, which lies in the vicinity of the city. The fort stands perched on a hill, at an altitude of approximately 700 m above the landscape that surrounds it. The height at which the fort stands has resulted in its being very popular.

Sindhudurg Fort
Maharashtra is known for its rich historical legacy. The land has been a silent witness to some of the most gruesome battles that have been fought in India. One such symbol of the rich historical past is the mighty Sindhudurg fort. It is situated in Sindhudurg district.
Bassein: Bassein Fort is about 55km from Mumbai. Located in Vasai this Fort was built by Bahadur Shah, the then Sultan of Gujarat. The Bassein Fort is in ruins now.

Daulatabad: Daulatabad Fort was built by Bhilma Raja of the Yadava Dynasty in 1187. It was then known as Devagiri or the Hill of Gods. Daulatabad gained its modern name by Mohammad Tughlak, when he wanted to shift his capital here and named it as Daulatabad or the City of Fortunes. It’s situated atop hill, 13 km from Aurangabad.

Gavilgad: The 300 year old Gavilgad Fort is Located near Chikhaldara hill station in Amravati district of Maharashtra. It is said that this is the place from where Bhima killed Keechaka and threw him down the hill into the valley. The Gavilgad Fort is now under the Melghat Tiger Project.

Ghodbunder: Away from the busy city lives, Ghodbunder is located atop hill in the lap nature’s tranquility. The panoramic view of the Bassein is not to be missed from here.

Murud – Janjira: Situated 165 km away from Mumbai Murud – Janjira is a walled island away from shore. This is probably the only fort standing strong on the 720km coastline of Maharashtra.

Murud – Harnai: The Murud – Harnai fort is famous for its clean beach, white sands and clear water. 

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०११



नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Pubile service commission) मुंबईने वर्ग- १, वर्ग २ अधिकारी वर्गाची भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर (३५ जिल्ह्य़ातून) रविवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०११ परीक्षेचे आयोजन केले आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक १० जानेवारी २०११ पर्यंत अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर (website) उपलब्ध आहेत.

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा २०११ ची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे-
१) पदाचे नाव- पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (गट अ), गट विकास अधिकारी, नायब- तहसीलदार (गट ब) व इतर पदे.

२) पदसंख्या - पदवार पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) पोलीस उपअधीक्षक/ सहायक पो. आयुक्त - एकूण ३२ पदे
२) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी - ५ पदे,
३) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - एकूण ७६ पदे)
४) उपअधीक्षक - भूमि अभिलेख - एकूण ४ पदे,
५) नायब तहसीलदार - एकूण १२६ पदे,
६) गट विकास अधिकारी - एकूण २ पदे.

३) वेतनश्रेणी - गट अ पदांकरिता रु. १५६००-३९१०० अधीक ग्रेड पे, तसेच गट ब पदांकरिता रु. ९३०० - ३४८०० अधिक ग्रेड पे व नियामानुसार भत्ते.

४) वयोमर्यादा - दिनांक १ एप्रिल २०११ रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांकरीता SC/ST/NT/OBC वय ३८ वर्षांपर्यंत)

५) शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्या अर्हताधारक असावा.

६) परीक्षा फी/शुल्क - जनरल/ अ मागाससाठी
रु. २६०/ व मागासवर्गीयांसाठी रु. १३५/- हे परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्जाची नोंदणी केल्यावर प्राप्त होणाऱ्या विहित चलनाद्वारे भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोख भरावे. (cash payment in SBI Br.)

७) अर्ज करण्याची पद्धत - राज्य सेवा (पूर्व) परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा. वेब बेस्ड (web based) ऑन लाईन अर्ज www.mpsconline.gov.in या वेबसाईटवर १० जानेवारी, २०११ या कालावधीत सादर करावा. (वेबसाईटवर अर्ज टाईप करून २ील्ल िकरावा व त्याची Print-out काढावी) अधिक मदतीसाठी आयोगाने मे. वास्ट इंडिया प्रा. लि. ची नेमणूक केली आहे. त्यांचा क्र. ९७५७४४४०२० आहे. त्यासाठी रु. २४/- सव्‍‌र्हिस चार्ज द्यावा लागेल. अर्ज online केल्यावर स्टेट बँकेत जाऊन परीक्षा फी रोख भरावी व त्यांच्याकडून Transaction ID हा नंबर अर्जावर अचूकरीत्या नोंदवावा (सविस्तर माहिती) MPSC च्या वेबसाईटवर उदा. www.mpsc.gov.in किंवा www.mpsconline.gov.in वर उपलब्ध आहे.

८) मार्गदर्शन वर्ग - राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे वर्ग
व स्टडी मटेरियल, पुस्तके पुढील केंद्रावर उपलब्ध आहे.
स्पर्धा परीक्षा केंद्र, द्वारा - प्रदीप क्लासेस, ४०८ सोमवार पेठ शाहू उद्यानामागे, संत गाडगेमहाराज मठ रस्ता, भाजीमंडईजवळ, पुणे ४११०११ मो.बा. ९५६१३४५१२९.

९) परीक्षा केंद्र - परीक्षेसाठी महाराष्ट्रात ३५ जिल्ह्य़ात केंद्रे आहेत. उदा. पुणे (कोड नं. ३८, मुंबई ३० (मध्य) मुंबई पश्चिम ३१, ठाणे ४३, नागपूर ३२ वगैरे).

१०) राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप- ही एक चाळणी परीक्षा आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सहा घटक व २२ उपघटकांमध्ये विभाजन केलेले आहे.
उदा.
१) कला शाखेतील घटक.
२) विज्ञान व आभियांत्रिकी शाखेतील घटक
३) वाणिज्य व अर्थव्यवस्था या विषयाचे घटक
४) कृषिविषयक घटक.
५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी.
६) बुद्धिमापन विषयक घटक

पूर्व परीक्षेसाठी एक पेपर असतो (सामान्य क्षमता चाचणी) या पेपरमध्ये २०० प्रश्न असतात व ते २ तासांत सोडवावे लागतात. पेपरचे माध्यम मराठी व इंग्रजी आहे. पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते हे लक्ष्यात घ्यावे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर मिळते. मुख्य परीक्षा १६०० गुणांची असते. यामध्ये सहा विषय आहेत. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर २०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर मेरिटनुसार निवड यादी तयार करतात.

परीक्षेसाठी उपयुक्त प्रकाशने-
१) निराली प्रकाशन व प्रगती प्रकाशनाची पुस्तके,
२) के. सागर प्रकाशन,
३) स्टडी सर्कल, 
४) युनिक प्रकाशन, 
५) किरण बुक्स प्रकाशन, 
६) चाणक्य मंडल प्रकाशन,
६) एनसीआरटी प्रकाशन,
७) इतर सरकारी प्रकाशने.

उमेदवारांनी या परीक्षेसाठी अवश्य प्रयत्न करावा. ही परीक्षा वर्षांतून एकदाच येते. प्रशासनात डायरेक्ट सहायक पोलीस आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी पदे मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, कठोर परिश्रम, जिद्द, वेळेचे नियोजन, चांगले मार्गदर्शन, चांगले स्टडी मटेरियल व पुस्तकांचे वाचन, मनन, केल्यास या परीक्षेत निश्चितच यश मिळेल.

यूपीएससी सीसॅटची तयारी


बुद्धिमापन, तार्किक युक्तिवाद, विश्लेषणात्मक क्षमता आणि सामग्री विश्लेषण



तुकाराम जाधव , बुधवार, ५ जानेवारी २०११ (Loksatta)
यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात नागरी सेवा कल चाचणी हा दुसरा पेपर समाविष्ट केला आहे. ज्यात बुद्धिमापन, तार्किक युक्तिवाद, विश्लेषणात्मक क्षमता आणि सामग्री विश्लेषण या घटकांचा समावेश आहे. अंकगणित, त्यातील मूलभूत प्रक्रिया व सूत्रे, तर्कनिष्ठ विचारपद्धती, आकडेवारीचे सादरीकरण व विश्लेषण या गणितीय स्वरूपाच्या बुद्धिमापन कौशल्याची तपासणी या घटकांद्वारे केली जाणार आहे. अर्थात यासाठी दहावीचा दर्जा हे मानक गृहीत धरले आहे. त्यामुळे विदय़ार्थ्यांनी विशेषत: दहावीनंतर गणिताशी संपर्क नसलेल्या विदय़ार्थ्यांनी याबाबत भय बाळगण्याचे कारण नाही.
बुद्धिमापन चाचणी

वस्तुत: यातील बुद्धिमापन चाचणी हा घटक पूर्वी सामान्य अध्ययनात समाविष्ट होता. मात्र तेव्हा याकडे दुर्लक्ष करणे शक्य होते. आता सीसॅट या पेपरमध्ये समावेश केल्यामुळे या घटकाची तयारी अटळ बनली आहे. बुद्धिमापन हा घटक अंकगणिताशी संबंधित आहे. यूपीएससीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास १४ ते १५ प्रकारची उदाहरणे अधोरेखित करता येतात. हे प्रकार मूलत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणितीय प्रक्रियांवर आधारित आहेत. संख्येचे प्रकार, संख्येचे वर्ग, वर्गमूळ; घन, घनमूळ; शेकडेवारी, अपूर्णाक; सरासरी, नफा-तोटा; गुणोत्तर प्रमाण; काळ-काम-वेग आणि समीकरणे या बाबींवर आधारित उदाहरणे परीक्षेत विचारली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत गणितीय कौशल्ये अवगत केली पाहिजेत. गणितीय प्रक्रियांमधील सूत्रेदेखील लक्षात ठेवली पाहिजेत. या मूलभूत पायाभरणीनंतर बुद्धिमापन या घटकात जे १४ ते १५ प्रकार समाविष्ट होतात, त्यांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करावा. एकेक प्रकार निवडून त्यातील प्रक्रिया समजून घ्यावी. त्याच्याशी संबंधित एखादे सूत्र लक्षात ठेवावे आणि त्या प्रकारच्या उदाहरणांचा भरपूर सराव करावा. प्रश्नाचे उत्तर शोधताना पर्यायांचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. विविध प्रकारच्या या उदाहरणांची तयारी करताना प्रत्येक उदाहरणात अंतर्भूत गणितीय पायऱ्या लक्षात घ्याव्यात. मात्र नंतर थेट उत्तरापर्यंत जाण्याचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. कारण प्रत्यक्ष पेपर सोडवताना या सर्व गणितीय पायऱ्यांचा विचार करून उदाहरणाची उकल करण्यासाठी आवश्यक वेळ प्राप्त होत नाही. वेळ हा घटक निर्णायक ठरणार असल्याने जलद गतीने उदाहरणे सोडवण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे.

बुद्धिमापनावर आधारित प्रश्नांच्या तयारीत भरपूर प्रश्नांचा सराव आणि सातत्यपूर्ण सराव ही बाब निर्णायक ठरणार आहे. दोन ते अडीच महिने दैनंदिन पातळीवर एक ते दीड तासांचा वेळ निर्धारित करून या घटकाची तयारी करावी. 

यासाठी CENP ची ८ ते १० ही मूलभूत पुस्तके आणि स्पेक्ट्रम किंवा टाटा मॅकग्राहील प्रकाशनाची गाईड्स संदर्भ म्हणून वापरावीत.

तार्किक युक्तिवाद क्षमता
तार्किक क्षमतेत सर्वसाधारण विधान वा तत्त्व, सोदाहरण स्पष्टीकरण, विशिष्ट नियमावर आधारित तर्क व योग्य अनुमान या घटकांचा समावेश होतो. दिलेल्या विधानाच्या आधारे शिस्तबद्धरीत्या निष्कर्ष काढले जातात. प्रश्नात दिलेल्या विधानातील ज्ञात तथ्यांच्या आधारे अज्ञात तथ्यांविषयी माहिती प्राप्त केली जाते आणि विधानातून योग्य निष्कर्ष काढला जातो. म्हणजेच यात विधानाचे आकलन, त्यात अध्याहृत गृहीतके, दिलेल्या विषयांतील वाद-विवादातील मुद्दे यांचे तर्कनिष्ठ अर्थ निर्णयन करून त्याआधारे निष्कर्ष काढणे व त्याची सत्यता तपासणे महत्त्वपूर्ण ठरते.

विधानासोबत दिलेल्या गृहीतकांची अध्याहृतता तपासणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश असतो. तर्कशास्त्रात दिलेल्या विधानांवर आधारित निष्कर्ष काढायचा असतो. ही विधाने वास्तव जगाशी जुळणारी असतात अथवा विपरीतही असू शकतात. वास्तव जगातील घटनांशी कितीही विपरत् असली तरी ती पूर्णपणे सत्य मानावयाची असतात. ती पूर्वसिद्ध असतात. म्हणून त्यास पूर्वपक्ष, अभ्युपगम वा विधाने असे म्हटले जाते. ही विधाने सकारात्मक, नकारात्मक अशी विविध प्रकारची असतात. तर्कशास्त्रातील नियमांच्या आधारे, विधानांचे स्वरूप पाहून, तर्कशुद्ध विचार करून विधानाच्या निष्कर्षांप्रत जाणे महत्त्वाचे मानले जाते. निष्कर्ष काढताना आकृत्यांचाही उपयोग करता येतो. गृहीतके हा यातील दुसरा घटक होय. एखादे विधान करताना विधानकर्त्यांने लक्षात घेतलेल्या बाबी म्हणजे गृहीतके होय. दिलेली गृहीतके विधानात अध्याहृत आहेत का याचे अचूक उत्तर विदय़ार्थ्यांनी द्यायचे असते. 

उदा. ‘एखादे चांगले पुस्तक महाग असले तरी ते विकले जाते’; या विधानात एका चांगल्या पुस्तकाबाबत माहिती दिली आहे. याचा अर्थ ‘काही पुस्तके इतर पुस्तकांपेक्षा चांगली आहेत’ हे गृहीतक अध्याहृत आहे; परंतु ‘बहुतांश पुस्तके महाग असतात’ हे गृहीतक अध्याहृत नाही. म्हणजेच दिलेल्या विधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ व तो शब्द त्या विधानात असण्याचे प्रयोजन याचा विचार करून गृहीतकाची अध्याहृतता तपासली पाहिजे.

काही प्रश्नांत युक्तिवाद दिलेले असतात. अशा प्रश्नांतील विधानात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्यांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी पुष्टी करणारी कारणे दिलेली असतात. ती कारणे कितपत तार्किक व प्रबळ आहेत यावर त्या प्रश्नाचे उत्तर ठरते. 
उदा. विधान - ‘धूम्रपानावर बंदी आणली पाहिजे का?’
(१) होय - कारण धूम्रपानावर कोटय़वधी रुपये खर्च करणे योग्य नाही.
(२) नाही - कारण तंबाखू उद्योगातील हजारो कर्मचारी बेरोजगार होतील.
या प्रश्नात धूम्रपानावर बंदी आणणे निश्चितच आवश्यक आहे. कारण ते आरोग्यास अपायकारक आहे; परंतु पैशाचा अपव्यय होतो म्हणून नव्हे. तसेच लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचवून रोजगारनिर्मिती नको म्हणून दुसऱ्या कारणाचेही समर्थन करता येत नाही. म्हणजेच विधानातील युक्तिवाद आणि त्याखालील कारणांचा विचार करता त्यातील कोणत्या कारणाच्या आधारे मुद्दा स्पष्ट केला आहे हे तपासणे गरजेचे आहे. या घटकाच्या तयारीसाठी विदय़ार्थ्यांकडे दिलेली माहिती काळजीपूर्वक, वस्तुनिष्ठपणे वाचण्याची सवय आणि त्याआधारे माहितीचे योग्य पृथक्करण करण्याची क्षमता हवी. गृहीतकांची विधानांशी असणारी सुसंगतता अत्यंत काटेकोरपणे पडताळून पाहावी लागते. त्या दृष्टीने दिलेल्या विधानाचे सर्व बाजूने पृथक्करण करणे, विधानातील प्रत्यक्ष (स्पष्ट) माहितीबरोबरच अप्रत्यक्षरीत्या व्यक्त होणाऱ्या माहितीचे आकलन करणे आणि विधान व गृहीतकांची संगती तपासणे ही कौशल्ये महत्त्वाची ठरतात. एकंदर पाहता विविधांगी वाचन, जलद वाचनाची सवय, विधान आणि त्याचा गृहीतकाशी असणारा संबंध याचे नेमके आकलन या क्षमता महत्त्वाच्या ठरतात. तसेच भरपूर सराव हे यावरील महत्त्वपूर्ण उत्तर आहे.
 
विश्लेषणात्मक क्षमता
दिलेल्या माहितीचे विशिष्ट उद्देशाने केलेले पृथक्करण म्हणजे विश्लेषण होय. यात प्रामुख्याने वर्गीकरण, तुलना, बैठक व्यवस्था, घटनाक्रम, दिशाबोध, नातेसंबंध, क्रम व मोजणी सांकेतिक भाषा, समूहातील पदांमधील परस्परसंबंध ओळखणे इ.चा समावेश होतो. यासाठी जास्तीत जास्त सराव करणे महत्त्वाचे आहे. दिलेली माहिती आकृतिबद्ध केल्यास प्रश्नांची उकल लवकर करता येते.
सामग्रीचे विश्लेषण

या अभ्यासघटकात दिलेल्या सामग्रीचे योग्य पृथक्करण करून आवश्यक आणि उपयुक्त माहिती प्राप्त करणे महत्त्वाचे असते. ही माहिती विविध स्वरूपात दिलेली असते. विशेषत: आकृतीच्या स्वरूपात ही माहिती दिलेली असते. उदा. विभाजित स्तंभालेख, संयुक्त स्तंभालेख, वर्तुळालेख इ. आकृत्यांच्या स्वरूपात सांख्यिकीय माहिती प्रस्तुत केलेली असते. आकृतीचे आकलन करताना अचूक निरीक्षणाद्वारे विविध घटकांची शीर्षके आणि एकके यांचा विचार करावा लागतो. तसेच आकृतीच्या सूचीतील माहितीदेखील काळजीपूर्वक पाहावी लागते.

सामग्रीच्या विश्लेषणावरील काही प्रश्न सोडवताना प्राथमिक अंकगणितीय क्रियादेखील उपयुक्त ठरतात. उदा. दोन बाबींच्या टक्केवारीची तुलना करण्यासंबंधी प्रश्न असल्यास त्याबाबत शेकडेवारीचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते. सरासरी, वाढ, घट यासारख्या प्रश्नांसाठीदेखील अंकगणितीय क्रियांचे ज्ञान गरजेचे असते. काही प्रश्न हे तक्ता स्वरूपातील माहितीवर आधारित असतात. तक्त्याचे अचूक पृथक्करण करून प्रश्नात विचारलेल्या नेमक्या बाबीचे आकलन करून त्यावरील प्रश्न सोडवणे शक्य होते. सामग्रीचे विश्लेषण करताना अचूक व नेमके वाचन, जलद गतीने वाचन आणि प्रश्नांचा भरपूर सराव या बाबी महत्त्वपूर्ण ठरतील. प्रश्न सोडवताना विविध प्रकारची उदाहरणे अधिक प्रमाणात सोडवावीत.
या विभागात येणाऱ्या सर्वच अभ्यासघटकांच्या बाबतीत प्रश्नांचा सातत्यपूर्ण व भरपूर सराव ही बाब निर्णायक ठरणार. कारण सरावाद्वारेच या घटकासाठी आवश्यक कौशल्ये निर्माण करून त्यांचा विकास करणे शक्य आहे.

Maharashtra Bhushan Award


The Maharashtra Bhushan is a highest and prestigious award presented annually by the government of Maharashtra state in India.
 
When the Shivsena- BJP alliance came to power in 1995, it proposed to institute this award.The Mahrashtra Bhushan was first awarded in 1996.

It was initially conferred in every years in the fields of Literature,ArtSport, and Science. Later the fields of Social WorkJournalism, and Public Administration and Health Services were included. The award is presented for outstanding achievement in their field.

Prize and selection

At present, the award carries a cash prize of lakh (500,000) rupees, a momento and citation. The winners are selected by a committee appointed of the Government of Maharashtra.

Recipients

http://t2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSWOdqrH_O5O0Cikdw0LgjJV_uuJy5EFuUef-8q7SFQ-bC1epbj ://t2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRiwS7td06m2E9Zoinh4cSnP-iQt9An62RW5ntxYC_L-Gai_gSg

The recipients of the Maharashtra Bhushan award are as follows :-

YearNameField
1996Pu La DeshpandeLiterature
1997Lata MangeshkarArts, Music
1999Vijay BhatkarScience
2001Sachin TendulkarSports
2002Bhimsen JoshiArts, Music
2003Abhay and Rani BangMedical Services
2004Baba AmteSocial Work
2005Raghunath Anant MashelkarScience
2006Ratan TataPublic Administration
2007R K PatilSocial Work
2008Nana DharmadhikariSocial Work
2008Mangesh PadgaonkarLiterature
2009Sulochana DeviArt, Cinma