जे आर डी टाटा


जे आर डी टाटा
**पहिले भारतीय वैमानिकभारताच्या हवाई उद्योगाचे जनकभारतातील अग्रगण्यउद्योजकआपल्या कामगारांचे आणि कर्मचार्यांचे हित जपणारा सहृदय उद्योजक... अशाकितीतरी विशेषणांनी जहांगीर रतनजी दादाभॉई उर्फ जे आर डी टाटा यांचे वर्णन करतायेईल.

**जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरीस (फ्रांसयेथे झालारतनजी दादाभॉय टाटायांचे ते द्वितीय पुत्रमुंबईतील कॅथेड्रल ऍण्ड जॉन केन्नॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले,पण जेआरडींची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यतफ्रांसमध्येच गेलेकाहीकारणाने ते मॅट्रीकच्या पुढे शिकू शकले नाहीत.

**इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईसब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होतेत्यामुळे त्यांनीही विमानशिकण्याचा ध्यास घेतलासन १९२९मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला.वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होतलगेचच १९३२ साली त्यांनी `टाटाएअरलाईन्सया पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केलीपुढे१९४६ साली त्याचे नाव बदलून `एअर इंडियाकेले गेले.
वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते `टाटा सन्स'चे चेअरमन झाले.त्यानंतर ते प्रदीर्घ काळ त्या पदावर विराजमान होतेत्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटासन्सच्या १४ कंपन्या होत्याजेआरडींच्या काळात ९१ कंपन्यांची त्यांनी भर टाकलीअनेकवेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी टाटा समूहाचा विस्तार केला रसायनवाहनचहामाहिती,हॉटेल्स आणि तंत्रज्ञान अशी अनेक नवीन क्षेत्र त्यांनी टाटा समूहासाठी खुली केलीएक एकक्षेत्र पादाक्रांत करीत असताना त्यांनी कोठेही नीतिमत्ता सोडली नाहीसर्व व्यवहारसचोटीने आणि पारदर्शकपणे करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.
उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनात कामगारांचे म्हणणेही ऐकले जावेअसे जेआरडींचेमत होतेजेआरडींच्या पुढाकाराने १९५६मध्ये कामगारांच्या कल्याणासाठी खास योजनाराबविण्यात आलीत्यामध्ये `दिवसातून आठ तास काम', `मोफत आरोग्य सेवा', `भविष्य निर्वाह निधीआणि `अपघात विमा योजनाअशा पायाभूत गोष्टींचा समावेशकरण्यात आला होतापुढे ही योजना भारत सरकारने सर्व उद्योग-व्यवसायांसाठीकायद्याने बंधनकारक केली.

**एवढेच नव्हेतर कामगार किंवा कर्मचारी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतरत्याची संपूर्ण जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारलीत्यामुळे वाटेत जर त्याचे काही बरे-वाईटझालेतर त्याचीही जबाबदारी कंपनीने स्वीकारायला सुरुवात केली.
जेआरडींच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापनझाल्याभारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफसोशल सायन्सेस आणि १९४५ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापनाकेलीआशियातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल १९४१ साली मुंबईत सुरू केले.

**जेआरडींना अनेक पारितोषिके मिळालीभारत सरकारतर्फे त्यांना १९५७ साली`पद्मविभूषण'नी सन्मानित करण्यात आलेतर १९९२ साली त्यांना `भारतरत्नहा सर्वोच्चभारतीय सन्मान बहाल करण्यात आलावयाच्या ८९व्या वर्षी२९ नोव्हेंबर १९९३ सालीजिनेव्हा (स्विट्झरलंडयेथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.