Yojna's by Govt of India





 This is taken form india year book 2010

List of खासदार of Maharashtra



you may also like to visit this few-important-links-for-study.html

What is President Rule?


What is President Rule?
President's rule
is a word that generally gets coined in India when a state legislature and state executive are suspended. Suspension of all the powers from the council of ministers and the president taking charge of the issues of the state is what President rule is. It is also called as Central rule. Federal government another name of presidential government takes the hold of all the powers of the state and the Governor of the respective state who is usually considered as having nominal authority rises to power and becomes the real authority like a lion coming out of den.

The governor is held responsible and answerable to all the proceedings of the state to the president. The Governor appoints advisory committees who are retired civil servants and retired government officials for the proper working of the state.

As per article 356, this rule comes into effect and the president on the advise of the governor or on his own attains the right to dissolve the state government and its council of ministers, thereby imposing president rule.The parliament must approve the president rule to come into effect. After the implementation of president rule, the governor heads the state and takes all the power. When President's rule is imposed, the assembly is either dissolved or kept in suspended.
When does presidential rule come into effect?


President rule generally gets into effect when political unrest takes the lead role in a democratic setup. This rule also gets implemented when the government of the state fails to meet the required majority in the office. If two thirds majority is not held then there is a chance of president rule. When the entire constitutionality breaks down then there is president rule after the agreement in parliament.

You can see this also ... great-books-by-indian-authors

कोणासारखे काय करावं . . ?


( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)
राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं
 You may also like to visit...

list-of-world-heritage-sites 

आधार


"आधार" अर्थात "भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक" या महत्वाकांक्षी योजनेस नुकतिच सुरुवात झाली. विशेष म्हणजे याची सुरुवात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून झाली आहे. भारतातील सर्व रहिवाश्यांना एक १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक या योजने अंतर्गत दिला जाणार आहे. हा विशिष्ट क्रमांक आयकर विभागाच्या पॅन प्रमाणे कायमस्वरुपी राहिल त्यात कोणताही बदल होणार नाही.

बॅंकेत खाते उघडायचे असेल, शिधावाटप पत्रिका मिळवायची असेल, पारपत्र काढायचे असेल, मोबाईल क्रमांक सुरु करायचा असेल वा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास प्रत्येक ठिकाणी व्यक्तिची खरी ओळख पटविणे हे सर्वात पहिले काम असते. तुमची ओळख जर तुम्ही पटवू शकलात तरच वरील गोष्टी सहज साध्य होतात. जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला वा ओळख पटविण्याच्या अन्य दस्तावेजाअभावी भटके विमुक्त, वनवासी व वंचितांना बॅंक खाते तर सोडा परंतु साधी शिधापत्रिका मिळणेही दुरापास्त होऊन जाते. मुख्य म्हणजे समाजाच्या वंचित घटकांसाठीच्या योजनांचाही लाभ त्यांना मिळत नाही. आधार क्रमांकामुळे ही अडचण दूर होण्यास नक्कीच मदत होईल. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचा या प्रकल्पातील सहभाग महत्वाचा ठरणार आहे. शहरी जनतेलाही आधारमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कागदपत्रांच्या पडताळणीत जाणारा वेळ तर वाचणार आहेच, परंतु वेगवेगळे दस्तावेज जोडण्याची कटकटही दूर होणार आहे.

इन्फोसिस या अग्रगण्य भारतीय कंपनीचे संस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची (Unique Identification Authority of India) स्थापना आधार प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. व्यक्तिच्या डोळ्यांचे व चेहर्‍याचे छायाचित्र आणि हातांच्या दहा बोटांचे ठसे संगणकीय पद्धतीने जमा करुन एका विशेष सर्वरवर सुरक्षितपणे साठविले जाणार आहेत. या १२ अंकी क्रमांकासोबत साठविण्यात येणारी माहिती सुरक्षित राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून केवळ नोंदणीकृत संस्थांनांच ही माहिती प्राप्त करता येईल. या संस्थांना सुद्धा फक्त त्यांच्या कामापुरतीच आवश्यक तेवढी माहिती ’हो’ किंवा ’नाही’ या स्वरुपातच कळविण्यात येईल.

असे असले तरी आधार बद्दल काही आक्षेपही आहेत व ते तेव्हढेच गंभीरही आहेत. कारण आधार क्रमांक फक्त भारतीय नागरिकांना मिळणार नसुन देशात राहणार्‍या कोणत्याही व्यक्तिलाही तो मिळणार आहे. परदेशी नागरीक वा घुसखोर याचे लाभार्थी ठरले तर योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जाईलच, पण देशाच्या सुरक्षितेलाही धोका पोहचू शकतो.

you may also like this GK  

SPACE RESEARCH


Scientists discover richest planetary system yet
Astronomers have discovered a planetary system containing at least five planets and which orbit a Sun-like star, HD 10180. They said there was evidence of two more planets in the same system, which would make it similar to our solar system in terms of the number of planets and their arrangement.

The planets and their sun-like star are about 127 light years from Earth, astronomers with the European Southern Observatory said. The system is one of only 15 known to have more than three worlds.

The five planets circle their parent star in a regular pattern like the planets of our solar system, only in a more compact arrangement, the researchers said. The confirmation of the extra planets would make it the highest tally of alien worlds ever spotted around a single star.

Of the two potential additional planets that may be present, one may have a mass that is the closest to Earth's, if it is confirmed, they added.

The planet would be rocky, like Earth, but probably far too hot to sustain life. With at least five Neptune-sized planets circling inside an orbit equivalent to that of Mars, the HD 10180 system has a more populated inner region than our solar system.

The five strongest signals correspond to planets with Neptune-like masses—between 13 and 25 Earth masses—which orbit the star with periods ranging from about 6 to 600 days. These planets are located between 0.06 and 1.4 times the Earth-Sun distance from their central star.

Among the other two planets that could exist, one would be a Saturn-like planet (with a minimum mass of 65 Earth masses) orbiting in 2200 days. The other would be the least massive exo-planet ever discovered, with a mass of about 1.4 times that of Earth.

So far, astronomers know of 15 systems with at least three planets. The last record-holder was 55 Cancri, which contains five planets, two of them being giant planets.

It took astronomers six years to study it using a planet-finding instrument called the HARPS spectrograph, attached to ESO's 3.6 metre telescope at La Silla, Chile.
CLICK HERE IF YOU WANT MORE    

विज्ञान प्रसारक संस्था


मराठी विज्ञान महासंघ
विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था

मराठीतून विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या सर्व संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी फेडरल पध्दतीची `मराठी विज्ञान महासंघ' ही संस्था ४ फेब्रुवारी १९७७ रोजी मुंबईत नोंदण्यात आली. मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निरनिराळया कार्यपध्दतीच्या अनुभवांचा फायदा सर्वांना मिळण्यासाठी अशा सर्व संस्थांचा एक संघ असावा या जाणिवेतून `मराठी विज्ञान महासंघाची' निर्मिती झाली. महासंघाची स्थापना ही विज्ञान प्रसाराच्या वेगवान प्रगतीमधील एक नैसर्गिक व अटळ घटना होय.

मराठी विज्ञान महासंघ हा संस्थांचा संघ असल्याने महासंघाला व्यक्ती सभासद नाहीत. महासंघाच्या घटक संस्थांच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधित्व महासंघ करतो. घटक संस्थांचे स्वायत्त स्वरूप कायम राहून त्यांना त्यांच्या सभासद संख्येच्या प्रमाणात महासंघाच्या प्रतिनिधी मंडळावर प्रतिनिधित्व मिळते. विज्ञान व त्याच्या प्रसाराविषयी समाजात असलेली अनास्था तसेच कार्यकर्त्यांची वाण व तोकडे आर्थिक बळ या सर्वांवर मात करण्यासाठी घटक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हीच महासंघाची कार्यशक्ती.

महासंघाचे मासिक मुखपत्र `मराठी महासंघ विज्ञान' प्रकाशनास जुलै १९७८ पासून सुरूवात झाली. अखिल महाराष्ट्नत व महाराष्ट्नबाहेरही महासंघाचे १५०० सभासद विखुरले असल्याने या सर्वांशी सततचा संपर्क साधणे या मुखपत्राच्या आधाराने शक्य असल्याने हे प्रकाशन प्रतिमासी प्रकाशित करण्यात आजवर महासंघाला यश मिळाले आहे. महासंघाच्या घटकसंस्थांमार्फत होणाऱ्या वैज्ञानिक कार्याचा वृत्तांत, तसेच जगातील विशेष महत्वाच्या वैज्ञानिक घटनांची नोंद या मुखपत्रातून घेतली जात असल्याने सभासदापर्यंत वैयक्तिक स्तरावर विज्ञान पोहोचविणे महासंघास शक्य झाले आहे.

घटक संस्थांच्या कार्यात सुसूत्रता ठेवण्याचा एक भाग म्हणून समान व सदृश कार्यक्रम घटक संस्थांमार्फत महासंघ घडवून आणतो. समान असा एकच कार्यक्रम विविध घटक संस्थांमार्फत आयोजित केला जातो तर एखाद्या विषयाला धरून विविध कार्यक्रम निरनिराळया ठिकाणी सदृश कार्यक्रमावाटे आयोजित केले जातात. याशिवाय विविध विषयावर व्याख्याने, परिसंवाद, संस्थाभेटी, वैज्ञानिक चर्चा वगैरे कार्यक्रम घटक संस्थांमार्फत केले जातात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी विज्ञान परिषद  
 
१९५७ साली रशियाने अवकाशात पहिला उपग्रह उडवला. १९५८ साली भारताचे वैज्ञानिक धोरण जाहीर झाले. १९६५ साली पंतप्रधान लालबहादुर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीची सुरूवात झाली. या आणि अशा सारख्या इतर घटनांमुळे हे काय घडते आहे याबद्दल समाजात एक कुतूहल निर्माण झाले होते. लोकांच्या मागणीमुळे वर्तमानपत्रात विमान विषय लेख तुरळकपणे दिसू लागले होते आणि साहित्य संस्थातून विज्ञान विषयावरील एखाद दुसरे भाषण होऊ लागले होते. समाजाची ही वाढती गरज लक्षात होऊन विज्ञान विषयक कार्य करणारी एखादी स्वतंत्र संस्था असावी असे काही जाणत्या लोकांना वाढले आणि त्यातूनच २४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाली.

संस्थेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
१) विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठीतून करणे.
२) विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृध्द करणे.
३) विज्ञानाचे जीवनात महत्व वाढवणे.
४) वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे या चार उद्देशांसाठी परिषदेने काम करायचे ठरवले.

परिषदेचे अध्यक्ष म्हणून नामवंत डॉक्टर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा. वि. साठे यांची आणि स्थापत्य अभियंता श्री. म. ना. गोगटे याची कार्यवाहपदी निवड झाली. पहिल्याच कार्यकारिणीत मधुमेहतज्ज्ञ डॉ. श्री. शा. आजगांवकर, गणितज्ज्ञ रँग्लर का. रा. गुंजीकर, प्रा. चिं. श्री. कर्वे, प्रा. प. म. बर्वे, प्रा. ना. वा. कोगेकर, सर्पतज्ज्ञ डॉ. पु. ज. देवरस इ. तज्ज्ञ होते.

परिषद मुंबईस सुरू झाल्यावर लवकरच महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर परिषदेच्या शाखा व विभाग सुरू झाले. परिषदेचे आज असे ५० विभाग आहेत. स्थापनेनंतर लगेचच संस्था धर्मादाय आयुक्त कायदा आणि सोसायटी कायद्याखाली नोंदली गेली.काही वर्षाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मराठी विज्ञान परिषदेस संशोधन आणि सांस्कृतिक कार्य करणारी संस्था म्हणून मान्यता दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मराठी विज्ञान परिषदेस मान्यता दिली असून अनेक कार्यक्रमांसाठी परिषदेस सरकार आणि शासनाकडून अनुदान मिळत असते. परिषदेस देणग्या देणार्‍यास आयकर खाते ८०-जी प्रमाणपत्रान्वये निम्म्या रकमेवर सवलत मिळते.

वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई येथे परिषदेची ६६० चौ. मी. क्षेत्रफळाची स्वत:च्या मालकीची दोन मजली इमारत असून आज या इमारतीत ४० आणि १७० माणसे बसू शकतील अशी दोन सभागृहे आहेत. या सभागृहात खुर्च्या, ध्वनीक्षेपक यंत्रणा, व्ही. सी. आर., ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्लाईड प्रोजेक्टर, फळा इ. सोयी आहे. परिषदेत १५ कर्मचारी पूर्ण वेळ काम करतात. फोन, फॅक्स, इंटरनेट अशा सर्व आधुनिक सोयी परिषदेत आहेत.