श्यामची आई-आनंदाचा ठेवा.


(21st February is International Mother Language Day)


श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मराठी बाल-कुमार साहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा.एक अभिजात साहित्यकृती.

२०१० हे या पुस्तकाचं अमृतमहोत्सवीवर्षसलग ७५ वर्ष एखादं पुस्तकजनमानसात रुजून बसणं ही काहीसोपी गोष्ट नाहींआईचं प्रेम हे यापुस्तकाचं मध्यवर्ती सूत्र.

एका साध्याबाळबोधसुसंस्कृत घराण्यातल्या संस्कृतीचं आणि त्या वेळच्या समाजाचंचित्रण या पुस्तकात आलं आहेश्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीच्याआठवणीतुमच्या आमच्या बालपणासारख्या त्या रम्य-सुंदर मात्र नाहीत.हे बालपणखडतर आहेगरीबीचं आहेपण या सगळ्याला पुरुन उरतोतो आईनं कलेला प्रेमाचा वर्षाव,दिलेली मूल्यं आणि कोणत्याही खडतर प्रसंगातून आपलं चारित्र्य अभंग राखून बाहेर कसंपडायचं याचं मिळालेलं शिक्षण.

या कादंबरीच्या रचनेतही वेगळेप़ण आहेश्याम आपल्या मित्रांना रोज रात्री एक याप्रमाणे४२ रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगतोअतिशय साधीसोपी आणि ह्रदयाला हातघालणारी भाषा हे याचं वैशिष्ट्यं.

साने गुरुजींच्याच शब्दात सांगायचं तरह्रदयातला सारा जिव्हाळा इथे ओतला आहेयागोष्टी लिहिताना माझे ह्रदय अनेकदा गहिवरून आणि उचंबळून आले आहे."

स्वातंत्र्यसेनानी म्हणून १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना पाच दिवसात सानेगुरुजींनी या आठवणी लिहून काढल्या१९३५ मध्ये पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्दझालीया पुस्तकानं प्ऱभावित झाला नाही असा वाचक विरळाआचार्य प्रकेअत्रे यांनीत्यावर काढलेला चित्रपटही खूप गाजला आणि त्याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळमिळालं.

साने गुरुजी हे महात्मा गांधीचा प्रभाव असलेले स्वातंत्र्यसेनानीविचारवंत होतेत्यांनीसत्याग्रहात भाग घेतलाभूमीगत राहून चळवळ चालवलीपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातदलितांना प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसलेसर्वात महत्वाचं म्हणजेभारतीय संस्कृतीचं भान असलेले ते लेखक होते.

'भारतातल्या प्रांताप्रांतात हेवेदावे असू नयेतएकमेकांनी एकमेकांच्या भाषा शिकाव्या,चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी ते प्रयत्न करीत.

आंतर भारती हे त्यांचं स्वप्नं होतंयासाठीच आजच्या मातृभाषादिनी त्यांची आठवणठेवणं फार गरजेचं आहे.

मराठीवर नितांत प्रेम करूनत्यात श्यामच्या आई'सारखं जागतिक दर्जाचं साहित्य त्यांनीलिहिलंइतर भाषांतलं साहित्य मराठीत आणलं.

त्या भाषांचा आदर केला.

आज गरज आहे ती याच विचारांची.